सहवास

 *सहवास...!* 

✍️ २८५५


स्वर्गातील देवतूल्य असणारी माणसं संगतीला असली की ? काळ कितीही वाईट असला अथवा गरीबी असली तरी ? नित्य स्वर्गाचाच आनंद असतो.

आणी ?

दररोज पंचपक्वांनाच ताट समोर असलं , राजऐश्वर्य जरी असलं , आणी संगतीला राक्षसी माणसं असतील तर ?

ते जीवन नरकापेक्षाही भयंकर असतं.


निरपेक्ष प्रेम हा साक्षात स्वर्ग होय तर ? स्वार्थी प्रेम हा तडफडवणारा जीवन प्रवास आहे.


म्हणूनच देवासारखी माणंस नित्य संगतीत असणं म्हणजे ? परम भाग्याचे लक्षण होय.


ईश्वरीय दिव्य अनुभूती साठी ? पवित्र ईश्वरीय व्यक्तींचा व शुद्ध आत्म्यांचा सहवास म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो.


श्रीकृष्णासाठी आपला भरजरी शालू ही द्रौपदी नेच, कसलाही विचार न करता, एका झटक्यात टरटरा का फाडला ?

प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण , रूक्मिणी , सत्यभामेपेक्षा राधेपाशीच का रमतो ?


सुख आणी दुःख सुध्दा म्हणूनच आपल्या संगतीवर अवलंबून असते. हल्ली माणसं आत्म्यांनं एकमेकाजवळ राहणं तर दूरच ? देहाने सुद्धा एकमेकाजवळ रहायला टाळतात , असं वाटू लागतं आहे ?

मग कारणे कांहीही असोत.


संत संगती सदा घडो 

सूजन वाक्य कानी पडो...


 *जय हरी विठ्ठल...!!* 


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

विश्व विजेता हिंदु धर्म