*लक्ष्मी आणि अवदसा.* *एक बोधकथा...* ✍️ २९४४ *विनोदकुमार* *महाजन...* 🌹🌹🌹🌹 जिथे लक्ष्मी राहते तिथे सुख शांती समाधान नांदते तर जिथे अवदसा राहते तिथे अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी राहतात.म्हणूनच लक्ष्मी आणि अवदसा ( दोघी बहिणी ) एकत्र राहू शकत नाहीत. एकीकडे शांती समाधान आहे तर दुसरीकडे अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी आहेत. एक संपन्न घर होते.व तिथे सदैव लक्ष्मीचा वास होता. सात भावंडे त्यांच्या पत्नी व मुलेबाळे मोठ्या आनंदाने एकत्र रहात होते. चुकुनही कुरबुर किंवा भांडण तंटा त्या घरात नव्हता. एक दिवस अलक्ष्मी ( अवदसा ) आपल्या बहिणीला लक्ष्मीला म्हणाली , " फक्त एक दिवस तु घरातून बाहेर जा मला घरात राहू दे. मग बघ घर कसे बरबाद करते ते ? " त्यावर लक्ष्मी हसून म्हणाली , " तु तिथे राहणे शक्य नाही.एक दिवसातच तू तिथून पळून जाशील." झाले... एक दिवस लक्ष्मी बाहेर गेली व घरात अवदसा घुसली...तिने घराची शांती बिघडवण्यासाठी , घरात कलह लावायला सुरुवात केली. स्वयंपाक करताना चुकून सात जावापैकी एकीकडून भाजीत मीठ प्रमाणापेक्षा जास्त पडले. खारटघोट झाली भाजी.( अवदसेची कमाल ) अवदसेला वाट...