Posts

सत्याच्या मागे संकट

 *नेहमी ? चांगल्या* *माणसांच्या मागेच संकटे* *का* *लागतात...???* ✍️ २८९७  *विनोदकुमार महाजन*  💔💔💔❓ चांगल्या माणसांच्या मागेच नेहमी संकटे मागे लागतात ? हे आपणास मान्य आहे का ? मान्य असेल तर हा लेख नक्की वाचा. तसं पाहिलं तर कलियुगाचा न्याय अगदी उलटा आहे. तुम्ही जेवढं खरं , सत्य , चांगलं वागाल त्याला हमखास जास्त दुःख , संकटे , अडचणी , त्रास , यातना भोगाव्याच लागणार आहेत. हे मनाशी अगदी पक्के ठरवून ठेवा. आणी चांगुलपणा न सोडता जादा संकटे व दु:ख भोगण्याची मनाची तयारी ठेवा. पश्चात्ताप न करता. ईश्वर साक्षी ठेवून. आणी ? कलियुगात नेहमी जो राक्षसी आचरण करेल त्याला मात्र भरभरून यश , धन नक्कीच मिळेल. कलियुगाचा उल्टा न्याय. म्हणून , हे असं जरी असलं तरी ? चांगला माणूस वाईट वागू शकत नाही.आणी ? वाईट माणूस चांगला वागू शकत नाही. आणी चांगल्या वाईटाचं वैर हे सर्वश्रूतच आहे. राम - रावण कृष्ण - कंस पांडव - कौरव भक्त प्रल्हाद - हिरण्यकश्यपू  आता हे असं का घडतं याचं विश्लेषण करू. तुम्ही जेवढे देव , धर्म जास्त कराल ,  तेवढी संकटे जादा का ? हे असं का ? सगळंच विपरीत कसं ? असा प्रश्न पडणं...

दुष्ट

 पागल , मूर्ख आणी दुष्ट लोकांना आटोक्यात ठेवून त्यांचे कल्याण करायचे म्हणजे केवळ महासंकटच नव्हे तर जीवावरचं संकटच अशांपुढे भिंतीवर डोके आपटून डोके फुटले तरी असल्या क्रूर माणसांवर काडिचाही फरक पडत नाही. विनोदकुमार महाजन

आडमुठी माणसं

 *ब्रम्ह संकट...* ??? ✍️ २८९६ जगात कांहीं माणसं अशी ही असतात की , त्यांच्यावर जीवापाड प्रेम करूनही कांहीं उपयोग होत नाही , त्यांचा विरोध करूनही उपयोग होत नाही आणी मौन आणी शांत बसुनही उपयोग होत नाही. आणी त्यांना कितीही समजावून घेतले तरीही उपयोग होत नाही. सगळंच आणी नेहमीच पालथ्या घड्यावर पाणी. मग अशा माणसांपाशी रहायचं कसं आणी जगायचं तरी कसं ? आणी अशा लोकांचं कल्याण तरी कसं काय करणार ?  अशा लोकांना खरं खोटं ही कळत नाही , चांगल वाईट ही कळत नाही. आणी दुसऱ्याच ऐकण्याचीही अशा लोकांची तयारी ही नसते.  स्वतःच खोटं जरी असलं तरी स्वतःचच खरं मानायला लावणारे असे लोकं म्हणजे ? कुणावर विश्वास ही अशी लोकं ठेवत नाहीत आणी ब्रम्ह देव जरी स्वतः प्रगटला तरी त्यालाही अशी लोकं पळवून लावतील . अशांच्या तावडीत एखादा संत सज्जन सापडला तर ? त्याची ही पळता भुई थोडी होईल.अशांच्या संगतीत रहायचं म्हणजे ? चोवीस तास डोकं गरगरायचं काम. तेज पाणी का बहाव ? यातून बाहेर पडायचं कसं ?  रात्रंदिवस जीव आणी श्वास गुदमरणार ना ? असंगाशी संग प्राणाशी संकट . टोकाची हेकेखोर माणसं. स्वतः श्रीकृष्ण एकनाथ महाराज यांचेकड...

मोदी का परिवार

 *खुद का परिवार ?*  ✍️ २८९५ जिन्हे खुद का परिवार संभालना भी आज एक कसरत ही नहीं बल्की ?सरदर्द बन रही है ? वो भी मोदिजी को भलाबुरा ज्ञान बटोर रहे है !? मोदिजी तो संपूर्ण देश को ही परिवार समझकर बडे हिंमत से और योजना बद्ध तरीकों से चला रहे है ! बडे ही बुध्दीमानी से चला रहे है ! और जिसे खुद का परिवार चलाना भी असंभव है ? वह मोदिजी को बडा बडा ज्ञान दे रहे है ?? फ्री का राशन खायेंगे ! फ्री का गॅस भी लेंगे ! फ्री का घर भी लेंगे और उल्टा ? मोदी हटाव के नारे भी लगायेंगे और मुहिम भी चलाएंगे ! वाह रे वाह दुनियादारी ! वाह रे वाह दुनियावालों ! वाह रे कृतघ्न लोगों ! कमाल के बेईमान और कृतघ्न लोग है दोस्तों ये तो ?? गद्दारी और बेइमानी की भी हद होती है !  *विनोदकुमार महाजन*

संत संगती

 *संत संगती*  सापाला मायेने जवळ घेऊन झोपल्यास ? तो कधी डसेल याचा भरवसा आहे का ? वाघ सिंहाला प्रेमाने कुरवाळल्यास तो आपल्याला कधी फाडून खाईल याचा भरवसा आहे का ? तसेच दुष्ट माणसे जवळ असल्यास आपला कधी घात करतील व आपले नामोनिशाण मिटवतील याचा काही भरवसा आहे का ? नाही.... म्हणूनच संत संगती सदा घडो... तिथे कसलाही धोका , विश्वासघात , कपट नाही.  *रामकृष्णहरी*   *विनोदकुमार महाजन*

वरचा खालच्याला दाबतो

 *वरचा खालच्याला* *दाबतो...* ✍️ २८९४  *विनोदकुमार महाजन*  👍👍👍👍 होय...जणू निसर्ग नियमच आहे हा... वरचा नेहमीच खालच्याला दाबत राहतो ? मराठी म्हणीमध्ये अनेक म्हणी आहेत... जसे... " वासरात लंगडी गाय शहाणी...  सत्तेपुढे शहाणपण चालत नाही... बळी तो कान पिळी... ज्याच्या हाती ससा तो पारधी..." वगैरे वगैरे... " बाॅस आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नेहमी दाबत राहतो... नवरा बायकोला नेहमी दाबत राहतो... मिळवती बायको नव-याला दाबत राहते...( कांही अपवाद वगळता ) श्रीमंत बायको ? गरीब नव-याला दाबत राहते...? ( कदाचित ? ) मोठा छोट्यांना दाबत राहतो... दादा , भाई सगळ्यांनाच दाबत राहतो..." इत्यादी इत्यादी... दाब , दबाव , दबावतंत्र , दादागिरी वगैरे शब्द चांगलेच लोकप्रिय आहेत. खरं खोटं देवचं जाणे. पण साधारण पणे वरील विचारात बरेच तथ्य असावे असे वाटते. कारण हवेचा सुध्दा दाबच मोजला जातो. राजकारण सुध्दा ब-याच वेळा दबाव तंत्रावरच चालते असे म्हणतात. दबावतंत्र नाही ते राजकारण कसले ? एकंदर काय तर ? सगळे जगचं दाबावर चालतयं का ? होय... अगदी वरीष्ठांचा दाब नसेल तर ? उनाड पोरं सुध्दा अगदी बिथरून जातात. आणी ...

हक्क संपलेले आहेत

 *हक्क ? संपलेले* *आहेत ???* ✍️ २८९३  *विनोदकुमार महाजन*  💔💔💔💔 होय... हक्क... एकमेकांनी एकमेकांना भांडण्याचे हक्क... ती लहान पणीची लुटूपुटूची लडाई , झगडे , भांडणे , रूसवे फुगवे... आणी ? कांही क्षणातच सगळे कांहीं विसरून ? पुन्हा प्रेमाने एकमेकांना हाका मारणे , पुन्हा ती लपाछपी खेळणे... पुन्हा एकमेकांवर जीवापाड प्रेम करणे...? खरंच किती रम्य होतं ना ते बालपण ? रूसवे फुगवे असुनही ह्रदयात प्रेम , माया , ममता , ममत्व , आत्मीयता होती. एकमेकांना एकमेकांची ओढ होती. कोणी चार दिवस बाहेर गावी गेले तर ? पुन्हा भेटीची हुरहुर होती , ओढ होती. नात्यात ओलावा होता. सगळ्यांची मनं ? जीवंत पाण्याचे वाहते झरे होते. खळाळते झरे. खळखळून हसणारे जीवंत झरे. एका झाडावरच्या फांदीवर सगळेच पक्षी छान , मस्त आनंदात रहात होते , आनंदाने बागडत , विहरत होते. रम्य ते बालपण... पाहुण्या रावळ्यांची रेलचेल. ती गप्पांची रात्र रात्र चाललेली महीफल. ते मोठमोठ्याने , गर्जना करून , केले जाणारे हास्याचे कारंजे , मनसोक्त हास्याचे फवारे... पण...??? हळूहळू दिवस सरले. नात्यात अंतर पडू लागले.हळूहळू हे अंतरही वाढू लागले. एक...