दु:ख
*दु:ख शेवटी एकट्यालाच* *भोगावे लागते...?* ✍️ २८४० *विनोदकुमार महाजन* 🫣🫣🫣🫣 दु:ख हे शेवटी प्रत्येकाच्या वाट्याला येतेच येते. आणी ते दु:ख पण शेवटी एकट्यालाच भोगावे लागते. प्रत्येकाला कांहीं ना कांहीं दुःख असतेच. आणी दु:ख म्हणजे ? भयंकर कष्टदायक आयुष्य. प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे असते.आणी प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या व्याख्या आणी अपेक्षाही वेगवेगळ्या असतात. पण ? दु:ख नेहमी स्वतःचेच मोठे वाटते.आणी ? परदु:ख शीतल ? दुसरा किती सुखी आणी आपणच किती दुःखी अशी सगळ्यांचीच साधारणपणे धारणा असते. पण एक मात्र नक्की खरे आहे की , प्रत्येकालाच आपल्या दु:खात नक्कीच कुणाची तरी सहानुभूती हवी असते. दु:खात कुणीतरी आपली आत्मीयतेने चौकशी करावी , मायेच्या चार शब्दांचा आधार देणारे कुणीतरी असावे , असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे.आणी तो मनुष्य स्वभाव ही आहे. आत्मीयता , प्रेम , माया , ममत्व पशुपक्षानांही समजते.मग आपण तर मनुष्य आहोत.आपणालाही दुःखाच्या प्रसंगात कुणाचा तरी मायेचा आधार असावा असे वाटते. पण शेवटी काय तर ? दु:ख हे शेवटी आपल्याला एकट्यालाच भोगावे लागते.त्यात वाटेकरी कोणीही नसतो.आणी...