Posts

पवित्र आत्मा

 आपण स्वतः दु:खातिरेकाने तडफडून मरत असतानाही दुस-याला आधार देणं , याला खरं ईश्वरीय प्रेम म्हणतात.अशावेळी इतरांना आधार देऊन दु:खातिरेकातून बाहेर काढूनही त्याने उलटं आपल्याला तडफडवणं याला जालिम विष म्हणतात.आणि कलियुगात तुम्हाला पावलोपावली जालिम विषच मिळेल.तुम्ही स्वर्गातून धरतीवर अवतरलेला दिव्य आत्मा असला तरी सुद्धा ?? उन्मत्त कलिचे राज्य... विनोदकुमार महाजन

धर्म योध्दा

 धर्म योध्दे कधीही हीन दीन लाचार नसतात.ते नेहमी शक्तीमाच असतात.आणि धर्म युद्ध जींकण्यासाठी त्यांना शक्तीमान बनुनच रहावे लागते.तुम्हालाही शक्तीमान व्हायचे आहे का ?? विनोदकुमार महाजन

अशक्य ही शक्य करतील स्वामी

 जेंव्हा कोणतीही गोष्ट अशक्य वाटू लागते अथवा एखादी केस हाताबाहेर गेली आहे असे वाटू लागते तेंव्हा कठोर तपश्चर्या करून अशक्य गोष्ट शक्य करता येते...अथवा हाताबाहेर गेलेली केस सुद्धा आटोक्यात आणता येते.मी स्वतः अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.गुरूमंत्रामध्ये जबरदस्त चैतन्य शक्तीचा संचार असतो.हा माझा स्वानुभव आहे. विनोदकुमार महाजन

अशक्य ही शक्य करता येते

 जेंव्हा कोणतीही गोष्ट अशक्य वाटू लागते अथवा एखादी केस हाताबाहेर गेली आहे असे वाटू लागते तेंव्हा कठोर तपश्चर्या करून अशक्य गोष्ट शक्य करता येते...अथवा हाताबाहेर गेलेली केस सुद्धा आटोक्यात आणता येते.मी स्वतः अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.गुरूमंत्रामध्ये जबरदस्त चैतन्य शक्तीचा संचार असतो.हा माझा स्वानुभव आहे. विनोदकुमार महाजन

गुरूमंत्र

 कितीही भयावह आणि मोठमोठी संकटे असली तरी ? गुरूमंत्रापुढे संपून जातात.... तसेच मनुष्य रूपी साप आपल्या भक्तांना डसले तर ? ते विष भगवंताच्या ह्रदयावर जखमा करतं... हरी ओम... विनोदकुमार महाजन

वरदहस्त

 सद्गुरूंचा वरदहस्त , ईश्वरी वरदान , अनेक देवीदेवतांचे आशीर्वाद , अनेक सिध्द पुरूषांचे वरदहस्त यामुळे कार्य शंभर टक्के सफल होणारच यात दुमत नाही.पण यथोचित काळाची प्रतिक्षा केल्याशिवाय पदरी कांहींच पडत नाही. विनोदकुमार महाजन  👍🌹🌹🌹

रोखठोक

 खोटंनाटं बोलून लोकांना फसवणं , कुणाच्या पुढं पुढं करणं , एखाद्याची हांजी हांजी करणं , गोड बोलून केसांनं गळा कापणं , आपल्याला कधी जमलंच नाही. रोखठोक बोलून कार्य वाढवणं म्हणावं तेवढं खरंच सोपं नसतं. विनोदकुमार महाजन