सत्याच्या मागे संकट
*नेहमी ? चांगल्या* *माणसांच्या मागेच संकटे* *का* *लागतात...???* ✍️ २८९७ *विनोदकुमार महाजन* 💔💔💔❓ चांगल्या माणसांच्या मागेच नेहमी संकटे मागे लागतात ? हे आपणास मान्य आहे का ? मान्य असेल तर हा लेख नक्की वाचा. तसं पाहिलं तर कलियुगाचा न्याय अगदी उलटा आहे. तुम्ही जेवढं खरं , सत्य , चांगलं वागाल त्याला हमखास जास्त दुःख , संकटे , अडचणी , त्रास , यातना भोगाव्याच लागणार आहेत. हे मनाशी अगदी पक्के ठरवून ठेवा. आणी चांगुलपणा न सोडता जादा संकटे व दु:ख भोगण्याची मनाची तयारी ठेवा. पश्चात्ताप न करता. ईश्वर साक्षी ठेवून. आणी ? कलियुगात नेहमी जो राक्षसी आचरण करेल त्याला मात्र भरभरून यश , धन नक्कीच मिळेल. कलियुगाचा उल्टा न्याय. म्हणून , हे असं जरी असलं तरी ? चांगला माणूस वाईट वागू शकत नाही.आणी ? वाईट माणूस चांगला वागू शकत नाही. आणी चांगल्या वाईटाचं वैर हे सर्वश्रूतच आहे. राम - रावण कृष्ण - कंस पांडव - कौरव भक्त प्रल्हाद - हिरण्यकश्यपू आता हे असं का घडतं याचं विश्लेषण करू. तुम्ही जेवढे देव , धर्म जास्त कराल , तेवढी संकटे जादा का ? हे असं का ? सगळंच विपरीत कसं ? असा प्रश्न पडणं...