संपादकीय रूपांतर
संवेदनाशून्य समाज आणि आत्मीयतेची गरज मनावर प्रेमाची एक फुंकर हवी... आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भौतिकतावादी युगात माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाच्या जवळ आला असला, तरी मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक प्रगती, आधुनिक सुविधा आणि माहितीचा महास्फोट यामुळे जीवन अधिक सुलभ झाले आहे; परंतु मानवी संवेदना, आत्मीयता आणि परस्परांविषयीची सहानुभूती यांचा मात्र लोप होताना दिसतो आहे. समाजातील वाढती संवेदनाशून्यता ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्याच्या दुःखाशी आपले काही देणेघेणे नाही, अशी मानसिकता नकळत वाढत चालली आहे. एखादी व्यक्ती संकटात असताना तिच्या मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकजण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात. काही वेळा तर दुसऱ्याच्या अडचणींमध्ये आनंद मानण्याची विकृतीही समाजात दिसून येते. पूर्वीच्या काळात कुटुंब, शेजार आणि समाज हे आधाराचे स्तंभ होते. संकटाच्या प्रसंगी माणसाला धीर देणारी, सांत्वन करणारी आणि साथ देणारी अनेक माणसे आजूबाजूला असायची. आज मात्र गर्दीतही माणूस एकाकी झाला आहे. संवाद वाढला, पण मनांचा संवाद हरवला आहे. मानवी जीवनात आत्मीयतेचे स्थान अनन्यसाधारण ...