Posts

दुरावा

 *दूर राहणे हितकारक*  आपल्या सत्याची व प्रेमाची जिथे कींमत शून्य असते, उलट तुमच्या विरुद्ध सतत षड्यंत्राच आणी बदनामीच पीकच सतत पिकवलं जातं आहे अशा ठिकाणी क्षणभरही थांबू नये उलट तिथले संबंध आयुष्य भरासाठी तोडून टाकलेले चांगले.कारण घुसमठीने जगण्यापेक्षा दूर राहून स्वाभीमानी आणी आनंदी जीवन जगणे केंव्हाही चांगले. जवळ राहून टिंगलीचा विषय होण्यापेक्षा , कायमचे दूर जावून , स्वाभिमान जपणे केंव्हाही चांगले.  *राम कृष्ण हरी*   *विनोदकुमार महाजन*

देह इथे अन् मन तिथे

 *देह इथं अन् मन ?*   *दुसरीकडं...??* ✍️ २८१४  *विनोदकुमार महाजन*  🤫🤫🤫🤫 देह इथं अन् मन मात्र दुसरीकडं... सगळ्यांच अगदी असंच असतं. आपण आपल्या कामात असतो अन् मन मात्र सगळीकडे सैरभैर फिरत असतं. अगदी गावभर सुद्धा भटकून येतं आपलं मन. ते सुध्दा एका झटक्यात. आपल्या मराठमोळ्या ग्रामीण कवियत्री बहिणाबाई चौधरी सुध्दा म्हणतात ना ? " मन वढाय वढाय..." काम करत करत आपण म्हणतो , " उद्या काय काशीला जायचा बेत आखायचा का ? " आणी मग मन एका झटक्यात काशीला पोचतं सुध्दा. काशी विश्वनाथाच दर्शन सुध्दा घेतलं मनाने. देह काशीला जेंव्हा जायचा असेल तेंव्हा जाईल. पण मन मात्र एका फटक्यात काशीची यात्रा करून आलं सुध्दा. अहो श्रीकृष्ण सुध्दा देहाने एक ठिकाणी असतो.पण मनाने मात्र ? सतत राधे जवळ. असं कोणतं दिव्य प्रेम आहे त्या राधेत...? ज्यामुळे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण सुध्दा तिच्या साठी वेडा झाला. असो... तर आपलं मन भरकटायला नको. पुन्हा मन या विषयावर येऊ या. मन फार चंचल , मन फार विचित्र. मनावर अनेक म्हणी सुद्धा प्रचलित आहेत. " मन चिंती ते वैरी ना चिंती..." " मन मेरा लागा यार फकिरी...

जोडिदार

 *एक खरा जोडीदार* *हवाच...!!!* ✍️ २८१३ 🌹🩷🌹🩷 प्रत्येकाला नेहमी अगदी मनापासून वाटत असतं...की... आपल्याला एक खरा जोडीदार हवा... सुखदु:ख वाटून घेणारा, संकटात खंबीर आधार देणारा , सगळी सुखदुःख सांगायला प्रत्येकाला अगदी एक हक्काची जागा हवी असते. होय. प्रत्येकाला अगदी असंच वाटत असतं. नेहमी वाटत असतं. मग तो मित्र असो , नातेवाईक असो... पण स्वार्थी, बेगडी , वरपांगी जगात , भपकेबाजपणा आणी दिखाऊपणात अडकलेल्या दुनियेत असं एक तरी नातं शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो. आणी ब-याच वेळा असं नातंच भेटत नाही , आणी आपलं मन अगदी नाराज होऊन जातं. दादा कोंडके सारखा शाहीर सुध्दा आपल्या एका गाण्यात आपलं दुःख हलके करतो आणी एक कुत्र्याला उद्देशून मराठी गाणे म्हणतो... " माझं माझं म्हणीत होतो , त्यांनीच मजला सोडलं , जन्मोजन्मीच नातं माझं गड्या तुझ्याशी जोडलं ! " काय भावपूर्ण शब्द रचना आहे ना मित्रांनो ? म्हणजे दादा कोंडके सारख्या महान कलाकाराला सुद्धा हे दुःख होतं तर ? दादा कोंडके एवढ्यावरच थांबत नाहीत तर ते पुढे म्हणतात , " चल रं वाघ्या रडू नको , पाया कुणाच्या पडू नको , आन्  दुनिया सारी जरी उलटली ...

कडू गोळी

 *कडू गोळी आणी कडू* *बोलणे ?* *हितकारक असते...??* ✍️ २८१२  *विनोदकुमार महाजन*  🤫🤫🤫🤫 कडू गोळी  कडू औषध नेहमीच हितकारक ठरते. भल्या भल्या आजारावर कडू औषधे रामबाण उपाय ठरतात आणी आजारही बरे करतात. आणी कडू बोलणे ? जर उद्देश साफ असेल , मन स्वच्छ असेल , अखंड कल्याणाची भावना असेल तर ? कडू बोलणेही हितकारक ठरते. आणी गोड बोलणारे ? केसाने गळा कापतात , असे म्हणतात. अलिकडे कडू बोलणे ही जणू एक फॅशनच झाली आहे.कुणीही उठतो आणी उणे दुणे काढून , द्वेषाने , कपटाने बोलतो , अशी बरीच उदाहरणे आज समाजात पहायला मिळतात. मग कडू बोलणे हितकारक कसे ? आई आपल्या लेकराला कधी कधी बदड बदड बदडते.पण तिच्या या बदडण्यात द्वेष नसतो तर माया असते.मायेची ऊब असते.ब-याच वेळा आई लेकराला कडू बोलते.आपल्या लेकराचे कल्याण व्हावे अशी तिची त्यामागची भावना असते. सत्पुरूष सुध्दा असेच असतात. कडू बोलतात ते समाज हितासाठी. पण स्वच्छ मनाच्या सत्पुरूषांना कोणी खलनायक ठरवून त्रास देत असेल तर तो काळाचा महिमा होय. वास्तविक अनेक संत महात्मे सुद्धा समाज सुधारणे साठी अनेक वेळा कठोर भूमिका घेतात. दुष्टांना सुधारण्यासाठी जसे कठोर का...

योग

 ब्रम्हांडीय शक्तिशी एकरूप होणे म्हणजेच योग..हेच जीवनाचे अंतिम साध्य होय. आणी हा योग साधला जातो तो सद्गुरू कृपेने... सद्गुरू आण्णा की जय  विनोदकुमार महाजन

समय

 मैं आपके लिये , आपके संपूर्ण कल्याण के लिये , समय देता हूं... अनेक लेख लिखकर... मगर आपके पास मेरे लिये समय ही नहीं है...खैर  विनोदकुमार महाजन

इच्छा

 *इच्छा तीथे मार्ग*  ✍️ २८११ पोटात भूक असेल तर  शिळी भाकरी अन् चटणी सुध्दा गोड लागते. पण पोटात भूकच नसेल तर पंच पक्वान्न ही नकोसे वाटतात. डोळ्यात झोप असेल तर शेतातल्या मातीवरही झोप लागते. पण डोळ्यात झोपच नसेल तर गाद्या गिरद्यावर तरी झोप कशी लागेल.? मनात इच्छा असेल तर अवघड कार्य सुध्दा सोपे होते. पण मनात इच्छाच नसेल तर सोपे कामही करायला जड जाते. मनात ओढ असेल तर ईश्वर सुध्दा भेटतो. पण मनात भावच नसेल तर ईश्वर तरी काय करणार ? इच्छा असेल तर नक्कीच मार्ग सापडतो. पण इच्छाच नसेल तर  मार्ग तरी कसा काय सापडेल ?  *विनोदकुमार महाजन*