कपटी लोक

 *कपटी लोकांपासून सावधान ?* 


ज्याच्या पोटात तुमच्याबद्दल सतत कपटभावना आहे ,

अशावर प्रेम करून अथवा त्याला सहकार्य करून तरी काय उपयोग ?


अशा व्यक्तिपासून सावध व्हा व

कायमस्वरूपासाठी व आयुष्यभरासाठी अशा कपटी लोकांचे संबंध पूर्णपणे तोडून टाका.


तरच आणी तरच तुम्हाला सुखाचे चार दिवस जगता येतील.

अन्यथा अशी कपटी लोकं तुमचा कधी घात करतील व जीवन बरबाद करतील हे

सांगता येणार नाही.


भगवान श्रीकृष्णाने सुध्दा कपटी व दुष्ट लोकांपुढे हात टेकले होते , हे लक्षात ठेवा.

कृष्णशिष्टाईसाठी स्वतः परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेला होता.

संघर्ष व रक्तपात नको म्हणून ईश्वर सुध्दा स्वतः सतत प्रयत्न करत होता.


पण कपटी व दुष्ट दुर्योधनाने श्रीकृष्णाशीसुध्दा कसा व्यवहार केला हे आपणास माहिती आहे.


म्हणून दुष्ट व कपटी लोकांपासून सदैव सावध व दूर राहणेच नेहमी हितकारक असते.


म्हणूनच चेहरे वाचायला व ओळखायला शिकलं पाहिजे.

तरच ईश्वरी कार्यात यश मिळेल.


तात्पर्य : - कपटी , ढोंगी , मायावी व दुष्ट लोकांपासून सदैव सावध रहा.


जय श्रीकृष्णा !!


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस