एक फूंकर

 मनावर प्रेमाची एक फूंकर हवी… https://globalhinduism.in/?p=3594


मनावर प्रेमाची एक फूंकर हवी https://globalhinduism.online/?p=5855


*मनावर फक्त एक फूंकर* *हवी....*

✍️ २८९१


 *विनोदकुमार महाजन* 


🫣🫣🫣✅


अख्ख जगच सद्या फारच बिकट अवस्थेतून जात आहे की काय असं वाटतंय.


विशेषतः संपूर्ण जगात विखुरलेला मनुष्य प्राणी.


दु:ख , दु:खातिरेक , दुःखाचा आगडोंब जणू सगळीकडेच उसळलेला दिसतोय.


आणी अशात , अशा भयंकर परिस्थिती मध्ये हवा असतो तो एक खंबीर आधार.खंबीर मानसिक आधार.

आणी ?

मनावर घातली जाणारी... एक हळूवार फुंकर.


पण वरचेवर मनुष्य नावाच्या प्राण्याला झालंय काय तर ? जवळजवळ अख्खा मनुष्य प्राणीच सगळीकडे अगदी कोत्या मनाने आणी कोत्या विचारसरणीने वागतो आहे की काय ? असे सहज वाटू लागले आहे.


इतरांच्या दु:खाचं त्याला जवळजवळ कांहीही घेणंदेणं नाही , अशी भयंकर सामाजिक स्थिती बनत चालली आहे.


मग अशा भयंकर आणी विचित्र स्थितीमध्ये कोण कुणाचा आणी कोण कुणाच्या मनाचा विचार करणार ?


मग दुस-यांच्या दु:खात त्याच्या मनावर फूंकर घालणे तर ? जवळजवळ दूरापास्तच.

एक मायेची फूंकर.एक आत्मियतेची फूंकर.


हल्ली कुणी कुणाच्या मनाचा विचार करायला तयार नाही.एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखाशी कांहीही घेणंदेणं नाही , असे सामाजिक विदारक चित्र सर्रास पणे जाणवते आहे.


आणी हे सत्य आहे.


लोकसंख्या वाढली पण माणूस कोता झाला.

माणसाच्या आत आत्मा असतो , याचाच जणू माणसाला विसर पडला.


आत्मा असून आत्मा मेलेली आत्मियता शून्य माणसे.

संवेदना शून्य समाज.


परदु:ख शीतल असते , हे एक वेळ समजण्यासारखे आहे.

पण ? एखादा दु:खातिरेकाने तडफडतो आहे , दुःखातिरेकाने गलितगात्र झाला आहे , तरी सुद्धा त्यांच्याबद्दल समाजाला अथवा समाजातील एखाद्या घटकाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नसावं ? खरंच किती अधोगती कडे गेला ना समाज ?


नैतिकता वगैरे संपली , हे एक वेळ समजू शकतो पण ? सामाजिक आत्मियता सुध्दा संपली ?

एवढा संवेदनाशून्य आणी बोथट समाज कसा झाला ?


उलटपक्षी एखादा दु:खातिरेकाने तडफडत असेल तर ? आनंदाने पेढे वाटणारांची संख्या सुध्दा झपाट्याने वाढत आहे ?

हा कसला विकृत समाज बनत चालला आहे ?

आणी विशेष म्हणजे याला ? अशा भयंकर विकृतीला निदान आज तरी काही उत्तर सापडत नाही.


एखाद्याच्या मयताला भाड्याने माणसे आणावी लागतात , इथवर ठीक आहे.

पण ?

मयताच्या टाळु वरील लोणी खाणारे अर्थात ?

एखाद्याच्या मृत्युचे सुध्दा भांडवल करणारे समाजात आज पहायला मिळतात ? हे ही फार मोठे आश्चर्य आज पावलोपावली बघायला मिळते आहे ?


मरणा दारी आणी तोरणा दारी भेदभाव करू नये , अशी एक जुनी म्हण आहे.

पण अलिकडे मरणादारी आणी तोरणादारी पण भांडणाचा आगडोंब उसळलेला आपणाला जागोजागी पहायला मिळतो आहे ?


दुसऱ्याच्या दु:खात आधार देणारा सुसंस्कृत समाज एकदम एवढा असंस्कृत , असभ्य , संवेदनाशून्य का बरे बनत चालला ?

हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे.


मग अशा भयावह परिस्थिती मध्ये खरोखरीच एखाद्याच्या दु:खात त्याला आधार देणारा भेटणे दूरच ?

एखाद्याच्या मनावर दुःखद प्रसंगी फूंकर घालणारा तरी थोडाच भेटणार आहे ?


दु:खद प्रसंगांमध्ये मनावर घातली गेलेली एक प्रेमाची फूंकर सुध्दा जीवनाला एक नवी उभारी तर देतेच .पण या उभारीतून सुध्दा बिघडलेले आयुष्य घडायला मदत होते.

आणी हीच उभारी ?

आयुष्याला एक नवी दिशा सुध्दा देऊ शकते.


पण ???

अशी मनाला उभारी देणारी मोठ्या मनाची माणसं जवळजवळ या दुनियेमधून नामशेष झाली आहेत असं वाटतंय.


निदान माझं तरी हेच मत आहे.आणी ? अनुभव सुध्दा.

कदाचित तुमचे मत आणी अनुभव सुध्दा वेगळे असू शकतील.


मनुष्य प्राणी धनाने मोठा होतो आहे पण ?

मनाने ? भिकारी , कंगाल होत चालला आहे , एवढं मात्र नक्की खरे आहे.


मनाची श्रीमंती संपली.

आणी जागोजागी मनाची गरीबी वाढत चालली.

धनाने श्रीमंत मनाने कंगाल , ही सामाजिक विदारकता बनत चालली.


याला कारणेही अनेक आहेत.

त्यातलं महत्वाचे कारण म्हणजे ?

पैसा हाच देव झाला.

आणी ?

खरा देवही बाजारात मांडला.


देवाच्या दर्शनबारीमध्ये सुध्दा ? पैसाच देव ठरला.

जो पैसा देतो ? त्याला आधी दर्शन ?


असो...

 *कालाय तस्मै नमः* 


🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ