पालथ काळीज
*पालथ्या काळजाची* *माणसं....?*
✍️ २७२०
🙊🤦♂️🤦♂️🤔🙊
खरंच जगात पालथ्या काळजाची माणसं असतात का हो ?
हो असतात .
आणी अशा माणसांशी
वागणं , बोलणं म्हणजे महाभयंकर संकट .
विशेषतः दुष्ट , मुर्ख , मंदबुद्धी , पागल , व्यसनाधीन अशी माणसं अशीच असतात .
असतातच असतात .
हेकेखोर .
स्वतःच खोटं असल तरी खरंच मानणारी .
व खोटसुध्दा पुढं रेटून नेणारी .
पालथ्या काळजाची .
त्यांना कितीही समजावून सांगा , कितीही उच्च कोटीचे प्रेम करा , अशा माणसांवर कांहीच फरक पडत नाही .
उलट अशी माणसं आपल्यालाच उपदेश करतात , आपल्याशीच भयंकर हुज्जतच
घालतात .
पालथ्या घड्यावर पाणी .
म्हणून अशा माणसांच्या नादी नाही लागलेल बरं .
अशापासूंन नेहमी चार हात लांब राहीलेलचं बरं .
।। दुर्जनंम् प्रथमंम् वंन्दे ।।
हेच खरं .
आपल्याला समाजात अशी माणसं नेहमीच भेटत असतात .
यांना दुरूनच नमस्कार केलेला बरा .
मुर्खाच्या नादी कधीही लागूं नये . दुष्टांच्या व कपटी लोकांच्या तर ? मुळीच नादी लागू नये .
तत्वज्ञान शहाण्याला सांगावं .
एकवेळ दगडालाही पाझर फुटेल असं म्हणतात .
पण पत्थरदिल माणसं म्हणजे....
महासंकट .
एखाद्या दगडाला शेंदूर लावला तर त्याचाही देव होतो .
पण पत्थरदिल माणसं ?
यांच्यावर कितीही प्रेम करा .
यांना कितीही समाजावून सांगा . यांच आयुष्य सुधारण्यासाठी कितीही प्रयत्नाची पराकाष्ठा करा....
कांहीही उपयोग होत नाही .
आपलं डोकं फुटलं ?
तरीही यांच्यावर कांहीही फरक पडत नाही .
आपलं डोकं फुटून रक्तबंबाळ झालं ?
तरी अशी माणसं....?
कधीही सुधरत नाहीत .
आपलं डोकं रक्तबंबाळ होऊन आपला जीव गेला ?
तरी यांच्यावर कांहीही फरक पडत नाही .
उलट हेच पालथ्या काळजाची माणसं आपल्याला म्हणतील....
" बरं झालं मेला...आपल्या कर्मानं मेला...."
अन् वरं पुन्हा आपल्यालाच हसतील सुध्दा .
आता मला सांगा....
अशा पालथ्या काळजाच्या माणसांवर प्रेम करून तरी कांहीं उपयोग होईल का हो ?
मुळीच नाही .
एकवेळ पशुपक्षी सुध्दा आपल्यावर निर्वाज्य , खरं प्रेम करतील . आपलं खरं प्रेम समजतील .
पण पालथ्या काळजाची माणसं ?
कधीही सुधारणार नाहीत .
म्हणून अशा माणसांना सुधारण्याचा अथवा त्यांना चांगलं सांगण्याचा कधीही प्रयत्न करू नये .
त्यापेक्षा मौन , अबोला , दुरावा , एकांत व ईश्वरी चींतन बरें .
त्याने आत्मकल्याण तरी होईल .
।। मौनं सर्वार्थ साधनंम् ।।
।। *जय हरी विठ्ठल* ।।
🤫🥸🥸🥸🥸
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment