आत्मियता

 *आत्मीयता संपली आहे* *का ?*

✍️लेखांकन : - २७१८


💁💁‍♀️💁‍♂️


मित्रांनो ,

खरंच जगातुनच

प्रेम , आत्मीयता , ममत्व , स्नेह , आपुलकी , माया , वात्सल्य संपत चालले आहे का ?

मानसाची मने रूक्ष , एकाकी बनत चालली आहेत का ?

घराघरायुन वात्सल्य , आत्मियता संपत चालली नव्हे तर , मनामनात दूरावे निर्माण होतं चालले आहेत का ?


एकमेकांच्या सुखदु:खाबद्दल खरंच कुणाला कांहीच वाटेनासे झाले आहे ?

एकमेकांपासून दूर राहण्यातचं समाज मनातील ब-याच घटकांना आनंद वाटतो आहे का ?

मानसाची मनं बोथट , संवेदनाशून्य बनत चालली आहेत का ?

संवेदनशीलता पार हद्दपारच होत चालली आहे का ?


हा काळाचा प्रभाव आहे की डाॅलरचा की समाजरचनेचा ? की सामाजिक आत्मकेंद्री पणाचा ?


समाजात वरपांगी दिखावा जसा वाढतो आहे तशीच मनामनाची उदासिनता , घालमेल ही खरंच वाढते आहे ?

नात्यागोत्यात दुरावा का वाढतो आहे ?


सामाजिक तेढ , नात्यागोत्यातील तेढ वरचेवर का वाढत आहे ?


आणि यावर उत्तर काय आहे ?


आत्मकेंद्री स्वभाव वाढत जाऊन , आत्मसंशोन , अंतर्मुखता कमी होत चालली आहे का ?


माझ्या लहानपणीचा काळ हा खरंच स्वर्णीम काळ होता .

माणसाची मनं मोठी होती , त्यामुळे माणसंही एकमेकांवर भरभरून प्रेम करायची .

सुखदुःख वाटायची .


भरलेल्या जुन्या वाड्यामधून हास्याचे फवारे उडायचे . आनंदाचे तरंग उमटायचे . माणसं एकमेकाची मनं जपायची .


आनंदाचे डोही आनंद तरंग..


आणि आता... बिनधास्तपणे मन जोडनं तर दूरच , एकमेकाची मनं जाणीवपूर्वक तोडली जातात . ?

एकमेकावर कुठाराघात केले जातात . ?

आणि आता समाजामध्ये मानसाची मनं दुखावण्यामध्येच धन्यता वाटते आहे का ?


का ???


कुठं हरवलो आपण ?

कुठे काळ हरवला तो ?

कुठे हरवले ते एकमेकावरील दिव्य प्रेम ?


एवढा विचित्र अन् विकृत समाज का निर्माण झाला .?


एकमेकाची प्रेमानं मनं जपायची , प्रेमानं मनं जिंकायची , एकमेकांना उच्च कोटीचा आनंद द्यायचा , एकमेकांची सुखदुःख समजावून घेऊन, एकमेकांना सुखदु:खात खंबीर आधार द्यायचा ,...

खरंच असा काळ हरवला ?


जो प्रेमाने , वात्सल्याने , आत्मीयतेने वागायचा प्रयत्न करतो तोही मुर्ख ठरला जातो ?


खरंच उच्च व आदर्श भारतीय संस्कृती कुठे लोप पावत चालली आहे ? आणी याची कुणाला खंतही नाही.?


आणि ज्याला याची खंत आहे , त्याची किंमत मात्र शून्य आहे.


आणि हेच भयंकर सामाजिक सत्य व समाजाचं विदारक चित्र आहे का ?


आणि याला उत्तर कांहीही नाही ???


एकत्र कुटुंब व्यवस्था मोडीत निघाली इथपर्यंत ठीक आहे.

पण विभक्त कुटुंब पध्दतीमध्ये आत्मीयता ही संपुष्टात आली का ?

हे कशाचे द्योतक आहे ?


समाज जोडणीचे प्रयत्नही संपत चालले ? उलटपक्षी समाज मन तोडण्याचे , असंतुष्ट करण्याचे , कलह वाढवण्याचे प्रयत्नच वाढू लागले ?


कशासाठी ?


एकमेकावर जिवापाड प्रेम करने , संकटात एकमेकांना खंबीर आधार देणे तर जवळजवळ दुरापास्तच होत चालले आहे का ?


की ही खरंच धर्म ग्लानी आहे ?

भयंकर धर्म ग्लानी आणि धर्म संकट !!?


यावर एकच उतारा व उत्तर आहे का ...??

अवतारी युगपुरूषाची...

भगवान श्रीकृष्णाच्या पुनरागमनाची...

प्रतिक्षा....


येईल का हो खरंच अवतारी युगपुरुष ?

सत्य अन् धर्म तारावया ?


येईल...

नक्कीच येईल...


" यदा यदा हि धर्मस्य...."

हे वचन पुर्ण करण्यासाठी तो येईल...


आज तो अवतारी युगपुरुष अवतरीत झाला आहे का...

प्रगट होण्याची त्याची वेळ पण जवळ आली आहे का ?


कोण आहे तो...

कुठे आहे तो...


श्रीकृष्ण: शरणं मम्


श्रीकृष्णार्पणमस्तु


🕉️🕉️🕉️🚩🚩


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर