प्रेमात विरघळून जावं !

 प्रेमात विरघळून जावं...!!!

( लेखांक : - २०८७ )


विनोदकुमार महाजन

--------------------------------

प्रेम !!!

किती पवित्र शब्द !

संपूर्ण ब्रम्हाण्डाला भेदण्याची शक्ती प्रेमामध्ये असते !

प्रेम ईश्वराच्या ह्रदयात निर्माण होतं !

म्हणून प्रेम हे अमृत असतं !


म्हणूनच ते पवित्र असतं,निष्पाप असतं,निष्कलंक असतं !

स्वर्गीय अमृतासमान !

पण त्याच्या मध्ये शुध्दत्व असावं !

शंभर नंबरी सोन्यासारखं !

निष्कपट !

स्वार्थाचा त्यात जराही लवलेशही नसावा !

प्रेमात स्वार्थ आला की तो व्यवहार होतो !

आणी प्रेमात व्यवहार कधीही नसतो !

माझं तुझं नसतो !

ते समर्पित असतं !


म्हणूनच प्रेमात अगदी विरघळून जावं !

मग ते नातं कोणतही असो !

गुरु शिष्याच असो,

भक्त भगवंताच असो,

पती पत्नीच असो,

भावा भावाच असो,

बहिण भावाच असो,

अथवा दोन मित्रांच असो !


धन वैभव, मोह माया,यश किर्ती यात खरं समाधान असतं का हो ?

याच्याही पलीकडे असतं ते दिव्यत्व,भव्यत्व अन् ईशत्व !


एकमेकावर खरंच प्रेम एवढं करावं ,की त्या प्रेमामध्ये विरघळून जावं,एकरूप व्हावं !


खूप दूर जरी गेलं,

आत्म्याने देहत्याग जरी केला,

तरी आत्म्याला दिव्य प्रेमाची दिव्य अनुभूती मिळावी !

अन् ते पवित्र प्रेम पुरं करण्यासाठी, आत्म्याने सुध्दा पुन्हा ....

देह बदलून यावं !

एवढी प्रेमाची शक्ती असावी !


भगवंतावर सुध्दा अस्स्...प्रेम करावं !

सद्गुरू वर सुध्दा अस्स्...प्रेम करावं !

स्वत:च अस्तित्व विसरून जावं !

संपूर्ण समर्पित प्रेम असावं !

प्रेमामध्ये स्वत:ला झोकून द्यावं !

दोन देह,आत्मा एक !

असं प्रेमात विरघळून जावं !


अशा प्रेमाचा भगवंत ही खरंच भुकेला असतो हो !

अशा प्रेमासाठी अगदी वेडापिसा होतो तो !

दास बनून राहतो तो अशा प्रेमासाठी !


प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण

एकनाथांच्या प्रेमासाठी वेडा झाला,अन् चक्क श्रीखंड्या बनून नाथांघरी पाणी वाहीलं हो त्यानं !

जनाबाई बरोबर कामं केली !

चोखामेळ्याची ढोरं ओढली हो त्यानं !

अर्जुनाचे घोडे धुतले !

प्रेमासाठी वेडा वेडा झाला भगवंत !

देव भावाचा भुकेला !

गंध,माळा,टिळा,आरती,नैवेद्य, दक्षिणा कांही कांही लागत नाही त्याला !

गंध,माळा,टिळा ही तर प्राथमिकता आहे !

भगवंताच्या जवळ जाण्याची !

त्याच्याशी एकरूप होण्याची !


हातात सुदर्शन चक्र घेऊन दुर्जनांचा कर्दनकाळ ठरलेला, कर्तव्य कठोर कृष्ण,

भक्तासाठी मात्र वेडा होतो !


अहो,प्रेम करून तरी बघा त्या भगवंतावर !

त्यासाठी तुमचं मन तरल हवं,संवेदनशील हवं !


खोटं,कपटी,नाटकी,स्वार्थी प्रेमही कळतं बर का त्याला !

तो ओळखतो बरं का सगळं!

असल्या नाटकी प्रेमापासून तो दूर पळतो !

कारण तो अंतर्यामी आहे !


तुम्ही केलंय का असं खरखुर प्रेम कधी ?

केलंय का असं प्रेम कुणावर ?

केलयं का असं खरंखुरं प्रेम भगवंतावर ?


कदाचित माणसापासून धोके मिळतील हो !

पण भगवंतापासुन धोका नाही मिळणार !

पण त्यासाठी आपणही त्याच्या प्रेमाशी एकरूप व्हावं,त्याच्या प्रेमामध्ये विरघळून जावं,स्वतःच अस्तित्व ही विसरावं,त्याच्या प्रेमासाठी आपणही रात्रंदिवस वेडपिसं व्हावं !


खरंच अशा प्रेमामध्ये जादू असते !

जीवनचं पालटून जातं अशा प्रेमामुळे !

आयुष्याला बहार येते !


आणी सगळं आयुष्यचं नवचैतन्यानं भरून जातं !


बघा मित्रांनो,

असं खरखुर प्रेम करायला जमतयं का ते ?


आणी द्वेष - मत्सर ?

राक्षसांच्या आणी दुष्टांच्या ह्रदयातून निर्माण झालेलं जालीम विष !

भयंकर जालीम जहर !

म्हणूनच दुष्टांची सावली सुध्दा पडू देऊ नये अंगावर !

विश्वासघात हा द्वेषाचाच दुसरा भाऊ !

म्हणून द्वेष करणाऱ्या, विश्वासघातकी माणसापासून हजारों पावलं दूर जावं !

सदैव हजारो पावलं दूर रहावं !

अन्यथा दुष्टांच्या संगतीत आयुष्यचं पार होरपळून,करपून जातं होतं हो !

म्हणून सदैव दुष्टांच्या सावलीपासून सुध्दा दूर जावं !


अन् दिव्य प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या, सत्पुरूषाच्या निरंतर सावलीत रहावं !

अन् तिथेच रमावं !

सत्पुरूषांच्या सावलीतच उभं आयुष्य सरावं !


असं मागणं भगवंताला करावं !


असं हे प्रेम अन् द्वेषाचं आयुष्याचं गणीत आहे !


ज्याला प्रेमामृत मिळालं तो भाग्यवान !

अन् ज्याला द्वेषाचं भयंकर, जालीम जहर मिळालं ?

त्यांच आयुष्याचं गणीत ?

हुकलं...!


हरी ओम्


बाकी पुढच्या लेखात

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस