एकाकी

 *असं का  ???* 

✍️ २५६६


आजकाल...

कुणी कुणाला समजावून घ्यायलाच तयार नाही.

जो तो एकमेकांच्या विकपाँईंटवर हमले करतोय.


प्रत्येकजण एकमेकांशी तडजोड करतोय , अन् ?

एडजेस्टमेंट करतोय ?

हे असलं जगणं अन् हे

असलं प्रेम ?

प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी

अनेक मुखवटे धारण करून जगतोय.

अन् जगण्यासाठी केवीलवाणा धडपडतोय

माणूस  ? 


जीवनाचा नैसर्गिक आनंदच संपला ? ते खळखळून मनसोक्त , मनमोकळं हसणं, गप्पांची मनसोक्त, मनमुराद मैफिल हे सगळंच गायब झालं ?


एकमेकाची ओढ , प्रेम , आत्मीयता कुठं गायब झालं सगळंच ?

माणसं एकमेकापासून मनानं दूर दूर चालली.

एकटं , एकाकी पडू लागली.

का बरं असं झालं ? 


द्वेष , मत्सर , नींदा खूपच वाढतय  ? 

लोकसंख्या वाढली पण माणूस मात्र एकाकी पडत चालला. 


काय झालंय माणसाला ?


हरी बोल


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

ईश्वर