वसकावसकी

 *वसकावसकी...!*?

✍️ २८७८


 *विनोदकुमार महाजन* 


🤫🤫🤔🫣


मित्रांनो ,

हल्ली समाजात बहुतेक एक नवीनच नातं निर्माण होतं चाललंय.

वसकावसकीचं.

एकमेकांच्या अंगावर वसकण्याचं , खेकसण्याचं एक अनाकलनीय आणी अद्भूत नाते ?


ह्यानं त्याच्या अंगावर वसकायचं ? त्यानं याच्या अंगावर वसकायचं.

ह्यानं त्याच्या अंगावर खेकसायचं ? त्यानं ह्याच्या अंगावर खेकसायचं.

जिकडे तिकडे वसकावसकी अन् खेकसाखेकसी ?


अजीब रसायन झालंय रे देवा समाजात ?


आता सगळीकडेच , घरोघरीच हा भयंकर रोग पसरला आहे की काय ? माहिती नाही.पण समाजात आज बव्हंश ठिकाणी हाच प्रकार बघायला मिळतो आहे.

एकमेकांचा विनाकारण पानउतारा करणे.


अहो ,

कुणी कुणाला नीट बोलायला , कुणी कुणाला समजावून घ्यायलाच तयार नाही.

जो तो फूल्ल टेन्शन मध्ये अथवा फूल्ल अहंकाराच्या झोनमध्येच सवार दिसतोय.


आणी दोन्हीकडून ही हमरा तुमरी चालू झाली की मग ?

नात्यात एक " विशेष बहार " येते आणी मग ?

अख्खे जीवन गाणेच रडगाणे होऊन जाते.

जीवनातला सगळा रंग रागच जणू निघून जातो.आणी बेरंग , बेसूर आयुष्य होऊन बसते.


" घरोघरी मातीच्या चुली  ? " आहेत का हो ?

माहित नाही.

पण बहुधा हे रडगाणे ब-याच ठिकाणी चालू असावे.


कुणी एकमेकांना समजावून घ्यायला , कुणी दुस-याच्या मताला कींमत द्यायला , दुस-याला मोठेपणा द्यायला कुणी तयारच दिसत नाही.


भलतंच घडायला लागलंय बूवा या देशात ?

विशेषतः अनेक नवरा बायकोच्या नात्यात ?

जिकडे तिकडे हमरी तुमरी ?

आणी मग ?

घटस्फोटाचे मॅटर ?


सुसंस्कृत समाजाला हल्ली काय झालंय तेच समजेनासं झालंय  बाबा.


समजूतदार पणा दाखवावा तर ? आतल्या आत कुढत बसाव लागतंय.

बरं , त्या कुढत बसण्याला ही कांहीच अर्थ रहात नाही हो.


हे म्हणजे अगदी आयुष्यभराचं दुखणं आणी ? त्यातून घडत असणा-या असहाय तडजोडी.


आता प्रत्येक घरातचं हे असं आक्रीत , विपरीत ? घडतंय असं मी मुळीच म्हणत नाही.

अगदी सुखी समाधानी , आनंदाने जगणारी , एकमेकांना समजावून घेणारी मस्त कुटुंबे असतील ही कदाचित.

पण ? बहुधा विरळाच.


टोकाचा समजूतदारपणा ही घात करतो आणी ? टोकाचा भांडकुदळेपणाही घात करतो.


मग जगायचं तरी कसं ?

आनंदाने जगणं तर ? जवळ जवळ दुरापास्तच होत चाललंय का .?


कटकटी नको म्हणून घेतलेली मनाची सपशेल माघार ? कधितरी कामी येतेच.पण सहनशीलतेचा ही अंत झाला की ? स्फोट होतो आणी रूपांतर ? भयंकर विस्फोटात होते.


दोन्ही बाजूकडून समजुतदारपणाचा अभाव , हे संघर्षाचं कारण असू शकेल.

समजूतदार पणा हा सगळ्या समस्येवर उत्तर ही असेल.पण ? समजूतदार पणाचाही अंत झाला की स्फोट हा होणारचं ना ?


अगदी खरं सांगू का ? आजकाल समाजात मनाचे मोठेपण वगैरे शब्द अगदीच ठिसूळ झाल्यासारखे वाटतायत.


अगदीच स्थितप्रज्ञ होऊन अथवा स्थितप्रज्ञ राहून , परिस्थिती वर मात करणे सगळ्यांनाच शक्य नसते.

सामान्य माणसं कसं काय स्थितप्रज्ञ राहू शकणार ?

हल्ली भल्याभल्यांच्या मेंदूचा भडका अगदी सहजासहजी होताना आपण पहातोय.

तिथं कसली आलीय स्थितप्रज्ञता ?

आणी समजा एखादा स्थितप्रज्ञ असेलही.

पण त्याचा तरी काय उपयोग ?

बोलत का नाही म्हणून त्यालाही मारून टाकतील ? कांही कृतघ्न लोग...?


तडजोडी वर तडजोडी करून जेंव्हा मन कंटाळतं तेंव्हा ?

मनाची उबग नावाचा भलताच प्रकार चालू होतो.

आणी त्यातूनही भलतंच आक्रीत घडायला लागतं.


कधी कधी भांडणात माघार जशी अंगलट येते तर ? कधी कधी आक्रमक पणा ही घात करतो.


संयमाचा बांध फूटणे , शांती भंग पावणे ?

असले प्रकार सुध्दा ब-याच ठिकाणी पहायला मिळतात.


पण अलिकडे समाजात हे असं विचित्र का घडतंय तेच कळेनासे झाले आहे.


असो...

यावर एकच तोडगा 

तो म्हणजे ?

गुरूत्वमध्य काढून ?

छान मस्त आनंदी जीवन जगायचं.

प्रेम , समजूतदारपणा जिथं सपशेल फेल जातो तीथं तडजोड कामाला येते.


तुम्ही म्हणाल ?

अहो तडजोडीला ही कांही अंत असतो का नाही ?


" जीवन इसी का नाम है प्यारे... यहाँ सबकुछ अलबेल करके ही जीना पडता है ! "


*श्रीकृष्णार्पणमस्तू...*


🕉️🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

विश्व विजेता हिंदु धर्म