महामित्र परिवार

 महामित्र परिवार !!!!!

------------------------------

मुंबई येथे संपन्न झालेल्या महामित्र कार्यक्रमांअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी केलेले उस्फुर्त भाषण व अभ्यासपूर्ण मांडणी सुरेख होती.राज्याचा मुख्यमंत्री किती संयमी,विचारी,अभ्यासु,विवेकी,व्यवहार चतुर व चाणाक्ष असावा व परिस्थितीचे गांभीर्य पाहुन त्यांचेमध्ये कशी उच्च कोटिची निर्णय क्षमता असावी हे मा.मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र जी फडणवीस यांनी सिध्द करुन दाखवले आहे.

या प्रसंगी बोलताना त्यांनी "अनुलोम",चा विषेश उल्लेख केला.

हे कार्य सफल बनविण्यासाठी अनुलोम सारख्या सेवाभावी संघटनेचाही सिंहाचा वाटा आहे हे ऐकुन समाधान ही वाटले.

महामित्र ची पुढील रणनीति काय हे मला माहित नाही.

तरीसुध्दा एक नम्र निवेदन करु इच्छीतो की ,

महामित्र चे कार्य संपलेले नाही तर आता कार्याची सुरुवात झाली आहे,असे समजुन...

महामित्र टीम व अनुलोम यांनी या माध्यमातून जी "नवरत्ने",निवडली आहेत त्या सा-यांसाठी राष्ट्रीय पुर्नबांधणीसाठी एखादी चांगली संधी उपलब्ध करून द्यावी.

त्यांना शासकीय पातळीवर एखादे प्रभावी व शक्तीशाली व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे.

प्रखर राष्ट्रवादी व्यक्तींची यासाठी निवड केली जावी.निष्कारण वाद उपस्थित करणारे, गोंधळ करणारे, विनाकारण भांडणे करणारे अशांना यामधून वगळण्यात यावे.

समाजविधायकता जपणा-या व्यक्तींना यावर निवडावे.समाज विघातक शक्तींना नेहमीसाठी दूर ठेवण्यात यावे.

सोशल मिडिया मधुन आलेल्या प्रभावी व्यक्तींना प्रसंगी पत्रकार दर्जाचे कार्य उपलब्ध करुन देण्यात यावे.व तशा सुविधा व व्यासपीठ उपलब्ध करून मिळावे.

समाजघडणीसाठी,नवराष्ट्र व संस्कार क्षम समाज निर्मिती साठी असे प्रभावी उपक्रम राबविणे नितांत गरजेचे व आवश्यक आहे.

माझ्या या निवेदनाचा विचार व्हावा.

माझ्यासारख्या अनेक महामित्रांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व महामित्र टीमचे शतशः आभार.


( अशाप्रकारच्या शासकीय योजनेत सहभागी होण्यासाठी मी स्वतः इच्छुक व उत्सुक आहे.)


हरी ओम.🙏🌹


निवेदन:-

श्री.विनोदकुमार महाजन,पत्रकार, पुणे.

मोबाईल नंबर:-

09890349751

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस