Posts

Showing posts from November, 2025

मोठी माणसं

 *मोठी माणसं ?* ✍️ २७१९ 🤔🤔🤔 ------------------------ जो मनानं मोठा आहे तो मोठा . जो विचाराने मोठा आहे तो मोठा . जो स्वकर्तृत्वाने मोठा आहे तो मोठा . जो इतरांचं सुखदुःख समजावून घेतो तो मोठा . जो इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो तो मोठा . जो समाजाचं सुखदुःख समजावून घेऊन त्यांना आधार देतो तो मोठा . धनाने मोठा आहे पण मनाने छोटा तर ? तो मोठा कसा होईल ? म्हणुन धनाने मोठं असणं किंवा होणं महत्वाचं नाही तर मनानं मोठं , श्रीमंत होणं महत्वाचं आहे . त्यामुळे सगळेच धनी लोकं समाजातील सुखदुःख समजावून घेतात का ? समाजाला योग्य मार्गदर्शन करून सामाजिक सलोखा , आत्मीयता वाढवतात का ? म्हणूनच आत्मकेंद्री श्रीमंती घातक असते तर समाजामुख श्रीमंती तारक असते . आज समाजामुख श्रीमंत कमी आणि आत्मकेंद्री श्रीमंतच जादा दिसताहेत . श्रीमंत असावं . श्रीमंत असणं गुन्हाही नाही . पण परदु:ख शितल असणारी श्रीमंती नको तर परदु:ख समजावून घेणारी श्रीमंती असावी . मी बरेच श्रीमंत बघितले . पण बरेचसे मनाने कंगाल बघितले . धनाने आणि मनाने श्रीमंत असणारे विरळा . असे धनवान, आपण त्यांना शंभर फोन करा , मेसेज पाठवा , उत्तर देणार नाहीत....

आत्मियता

 *आत्मीयता संपली आहे* *का ?* ✍️लेखांकन : - २७१८ 💁💁‍♀️💁‍♂️ मित्रांनो , खरंच जगातुनच प्रेम , आत्मीयता , ममत्व , स्नेह , आपुलकी , माया , वात्सल्य संपत चालले आहे का ? मानसाची मने रूक्ष , एकाकी बनत चालली आहेत का ? घराघरायुन वात्सल्य , आत्मियता संपत चालली नव्हे तर , मनामनात दूरावे निर्माण होतं चालले आहेत का ? एकमेकांच्या सुखदु:खाबद्दल खरंच कुणाला कांहीच वाटेनासे झाले आहे ? एकमेकांपासून दूर राहण्यातचं समाज मनातील ब-याच घटकांना आनंद वाटतो आहे का ? मानसाची मनं बोथट , संवेदनाशून्य बनत चालली आहेत का ? संवेदनशीलता पार हद्दपारच होत चालली आहे का ? हा काळाचा प्रभाव आहे की डाॅलरचा की समाजरचनेचा ? की सामाजिक आत्मकेंद्री पणाचा ? समाजात वरपांगी दिखावा जसा वाढतो आहे तशीच मनामनाची उदासिनता , घालमेल ही खरंच वाढते आहे ? नात्यागोत्यात दुरावा का वाढतो आहे ? सामाजिक तेढ , नात्यागोत्यातील तेढ वरचेवर का वाढत आहे ? आणि यावर उत्तर काय आहे ? आत्मकेंद्री स्वभाव वाढत जाऊन , आत्मसंशोन , अंतर्मुखता कमी होत चालली आहे का ? माझ्या लहानपणीचा काळ हा खरंच स्वर्णीम काळ होता . माणसाची मनं मोठी होती , त्यामुळे माणसंही एकम...

लक्ष्मी भगवंत

 जो भगवंताचा व माता महालक्ष्मीचा अंश घेऊन धरतीवर येतो तो आपले धर्म कार्य पूर्ण करूनच परत जातो . लक्ष्मी भगवंत की जय . विनोदकुमार महाजन